Skip to main content

Posts

Showing posts from January, 2026

नवरा आणि बायको यांच्यातील विश्वास किती महत्त्वाचा?

                                             विश्वास नवरा बायकोच्या नात्यातील           कोणी आपल्या भविष्याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. कधी काही घडेल, हे आजपर्यंत कुणाला सांगता आलेलं नाही आणि सांगता येणारही नाही. जीवनाबद्दल भरभरून बोलायचं आणि विचार करायचा, त्याचे कारण लग्न बंधनात जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी अडकते तेव्हा, ते दोघेही आपल्या येणाऱ्या आयुष्याबद्दल बरीच स्वप्ने रंगवीत असतात पण त्यातील किती पूर्ण होतात हा विषय बाजूलाच राहतो. या लेखाच्या माध्यमातून लग्नानंतर असणारे नवरा बायकोचे नाते आणि त्यांच्यातील विश्वास याचा  उलगडा करणार आहोत.           पूर्वीच्या काळापासून लग्नाची परंपरा आजही भारतात चालू आहे. आपल्या संस्कृतीत लग्नाला पवित्र आणि शुभ मानले जाते. सुरुवातीला जी लग्न व्हायची त्यामध्ये आई-वडिलांच्या  शब्दाला किंमत देऊन  मुलगा आणि मुलगी पसंत केली जायची. बदलत्या काळानुसार लग्न पद्धतीत बदल होत गेला. पूर्...

शेतकरी असल्यानंतर आयुष्य खरंच खडतर असते का? समजायचं असेल तर राजन गवस लिखित कादंबरी "ब,बळीचा " नक्की वाचायला हवी.Short Summary

                                         पुस्तकाचा सारांश                                    "राजन गवस " लिखित कादंबरी 'ब,बळीचा ' पुस्तकाचे मुखपष्ठ             कोणत्याही पुस्तकाच्या नावावरून बऱ्याच गोष्टी समजत असतात. हे पुस्तक वाचण्यासाठी घेतल्यानंतर,शेतकऱ्याशी संलग्न कादंबरी असणार आहे हा विचार मनामध्ये होता. आजपर्यंत अनेक पुस्तकांचे वाचन करताना ठराविक कल्पना करता येते, तसे या ठिकाणी करता येत नव्हती. या पुस्तकात कथा, पटकथा आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांचे वास्तव वाचकांसमोर मांडण्याचा सुंदर आणि वेगळा प्रयत्न लेखकाने केला आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जी काही कादंबरी वाचतो, त्यावेळी दिपूशेठ, कोणकेरी आणि आडव्याप्पा या तिघांची वेगवेगळी कथा, शेतकऱ्यांचे,सामान्य माणसांचे त्यांच्या आयुष्यातील वास्तव क्षणाक्षणाला हे पुस्तक वाचताना जाणवते. कित्येकदा आपोआपच...