Skip to main content

Posts

जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करू शकतो.. "डॉ. द.व्यं. . जहागिरदार " लिखित "स्टीफन हॉकिंग " यांचे चरित्र.. थोडक्यात सारांश

                   "डॉ.द.व्यं.जहागिरदार " लिखित "स्टीफन हॉकिंग " या पुस्तकाचे मुखपृष्ठ                                          पृष्ठसंख्या: ९५    अनेक व्यक्ती समाजात आपण पाहतो, ज्या समाजात वावरताना स्वतःची तुलना इतरांशी करतात. आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीकडे काय जास्त आहे,याचा विचार करून बऱ्याचदा दुःखी  होतात. आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टीची किंमत कळण्यासाठी विचारात खूप परिपक्वता असावी लागते, हे झाले शरीराने आणि बुद्धीने धडधाकट असणाऱ्या व्यक्तींसाठी. पण ज्यावेळी जन्मतः किंवा कोणत्यातरी आजाराने एखाद्याला अपंगत्व आले तर मात्र त्या गोष्टीची,त्याच्या दुःखाची कल्पना देखील आपण करू शकत नाही. पण अशा संकटातून पुढे जाऊन आपल्या  इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या जोरावर समाजापुढे एक आदर्श उदाहरण तयार करणाऱ्या महान व्यक्ती देखील आहेत,त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्यातील क्षमतेपेक्षा जास्त यश आपण संपादन करू शकतो. भौतिकशास्त्रात आपल्या...
Recent posts

चार्ली चॅप्लिन यांच्या आयुष्यातील या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? हेच जाणून घ्यायचं असेल तर "ल. म. कडू " लिखित चरित्र "चार्ली चॅप्लिन " नक्की वाचायला हवे

                                                     पुस्तकाचे मुखपृष्ठ                                                  लेखक: ल. म. कडू                                                 एकूण पृष्ठसंख्या : १००      प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख संघर्ष आव्हाने असतात पण त्या सगळ्या परिस्थितीमधून बाहेर पडून बोलता येणाऱ्या, बोलू न शकणाऱ्या, ऐकणाऱ्या ,ऐकू न शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हसवणारा अवलिया म्हणजे चार्ली चॅप्लिन. एक विनोद वीर स्वतःच्या संपूर्ण आयुष्यात असणारे दुःख विसरून फक्त हसवण्यासाठी आयुष्यभर झटत राहतो. त्यांच्या अनेक चित्रपटांनी, दुःखात असणाऱ्या अनेक जीवांना हसवण्याचा प्रयत्न केला आणि त्या...

अंगावर फुटलेला कोड आणि त्यामुळे हरवते का माणुसकी?"सुधा मूर्ती " लिखित सुप्रसिद्ध कादंबरी "महाश्वेता " मराठीत अनुवाद "उमा कुलकर्णी " ....थोडक्यात सारांश

                                      "सुधा मूर्ती " लिखित कादंबरी "महाश्वेताचे"मुखपृष्ठ       एखाद्या व्यक्तीला आपण चांगली किंवा वाईट असे लेबल देतो त्यावेळी बऱ्याचदा त्यांच्या असण्यापेक्षा, त्यांच्या दिसण्यावर जास्त भर देतो. एखादी व्यक्ती दिसायला चांगले असेल पण तिच्यावर चांगले संस्कार झालेले नसतील, वर्तन चांगलं असेल तरी देखील फक्त चांगल्या दिसल्यामुळे जर त्यांना समाजात मान सन्मान दिला जात असेल, तर या गोष्टीवर विचार करणे गरजेचे बनते. त्याचप्रमाणे कोणतेही आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना देखील कधी कधी भेदभावाची वागणूक दिली जाते. त्यावेळी त्यांच्या मनावर काही परिणाम होत असेल, याचा विचार आपण सहसा करत नाही. पण ज्यावेळी महाश्वेता ही कादंबरी वाचनात आली, त्यावेळी त्यांचे भविष्य खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर तरळून गेले. "महाश्वेता " या कादंबरीच्या मूळ लेखिका "सुधा मूर्ती " या आहेत आणि या कादंबरीचा मराठीत अनुवाद  "उमा कुलकर्णी " यांनी केलेला आहे.       या कादंब...

" सुधा मूर्ती " लिखित कादंबरी " अस्तित्व " मराठीत अनुवाद प्रा. ए.आर.यार्दी ...पुस्तकाचा सारांश Short Summary

                                                    पुस्तकाचे मुखपृष्ठ                                              लेखिका: सुधा मूर्ती           ज्यावेळी आपण अस्तित्व या शब्दाचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी प्रत्येक व्यक्ती आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा खटाटोप करताना दिसते. एखाद्या ठिकाणी जर का आपल्या असण्याने किंवा नसल्याने काहीच फरक पडत नसेल, तर मात्र अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि " सुधा मूर्ती " लिखित " अस्तित्व " ही कादंबरी, या कादंबरीचा नायक मुकेश, याच्या जन्मापासून पुढील आयुष्याला वाचकांसमोर मांडण्याचा आणि त्याबरोबर मानवी स्वभावाच्या अनेक छटा समजावून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो. ही कादंबरी मूळ कन्नड भाषेत " तुमुला " या नावाने प्रसिद्ध झालेली आहे. तसेच या कथानकावर आधारित एक मालिका ...

नवरा आणि बायको यांच्यातील विश्वास किती महत्त्वाचा?

                                             विश्वास नवरा बायकोच्या नात्यातील           कोणी आपल्या भविष्याबद्दल ठामपणे सांगू शकत नाही. कधी काही घडेल, हे आजपर्यंत कुणाला सांगता आलेलं नाही आणि सांगता येणारही नाही. जीवनाबद्दल भरभरून बोलायचं आणि विचार करायचा, त्याचे कारण लग्न बंधनात जेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी अडकते तेव्हा, ते दोघेही आपल्या येणाऱ्या आयुष्याबद्दल बरीच स्वप्ने रंगवीत असतात पण त्यातील किती पूर्ण होतात हा विषय बाजूलाच राहतो. या लेखाच्या माध्यमातून लग्नानंतर असणारे नवरा बायकोचे नाते आणि त्यांच्यातील विश्वास याचा  उलगडा करणार आहोत.           पूर्वीच्या काळापासून लग्नाची परंपरा आजही भारतात चालू आहे. आपल्या संस्कृतीत लग्नाला पवित्र आणि शुभ मानले जाते. सुरुवातीला जी लग्न व्हायची त्यामध्ये आई-वडिलांच्या  शब्दाला किंमत देऊन  मुलगा आणि मुलगी पसंत केली जायची. बदलत्या काळानुसार लग्न पद्धतीत बदल होत गेला. पूर्...

शेतकरी असल्यानंतर आयुष्य खरंच खडतर असते का? समजायचं असेल तर राजन गवस लिखित कादंबरी "ब,बळीचा " नक्की वाचायला हवी.Short Summary

                                         पुस्तकाचा सारांश                                    "राजन गवस " लिखित कादंबरी 'ब,बळीचा ' पुस्तकाचे मुखपष्ठ             कोणत्याही पुस्तकाच्या नावावरून बऱ्याच गोष्टी समजत असतात. हे पुस्तक वाचण्यासाठी घेतल्यानंतर,शेतकऱ्याशी संलग्न कादंबरी असणार आहे हा विचार मनामध्ये होता. आजपर्यंत अनेक पुस्तकांचे वाचन करताना ठराविक कल्पना करता येते, तसे या ठिकाणी करता येत नव्हती. या पुस्तकात कथा, पटकथा आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांचे वास्तव वाचकांसमोर मांडण्याचा सुंदर आणि वेगळा प्रयत्न लेखकाने केला आहे. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जी काही कादंबरी वाचतो, त्यावेळी दिपूशेठ, कोणकेरी आणि आडव्याप्पा या तिघांची वेगवेगळी कथा, शेतकऱ्यांचे,सामान्य माणसांचे त्यांच्या आयुष्यातील वास्तव क्षणाक्षणाला हे पुस्तक वाचताना जाणवते. कित्येकदा आपोआपच...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातील काही निवडक घटना त्यांच्या शब्दात "माझी आत्मकथा " या पुस्तकामध्ये... पुस्तकाचा थोडक्यात सारांश

                   डॉ. बाबसाहेब आंबेडकर लिखित पुस्तक, " माझी आत्मकथा" याचे मुखपृष्ठ       डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे "माझी आत्मकथा " हे पुस्तक खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातील संघर्षाला, दीन-दलितांचे कैवारी बनत असतानाचा प्रवास त्यांनी त्यांच्या शब्दांत सांगितला आहे. त्यांचे शब्दच वाचकांना प्रेरणा देऊन जातात. कोणतीही व्यक्ती यशाच्या शिखरावर जात असताना,तिथे पोहोचताना, त्यांना किती गोष्टींचा त्याग करावा लागतो, कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो याची आपल्याला कल्पना करता येत नाही. आत्मकथेच्या रूपातील हे पुस्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणापासून ते रमाबाईंच्या त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्याच्या प्रसंगापर्यंत, दलितांचा उद्धारक होण्याचा त्यांचा प्रवास, त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि निवडक मनाला भिडणाऱ्या घटना या पुस्तकात पाहायला मिळतात. आणि हे पुस्तक वाचत असताना त्यांचा विषयी असणारा अभिमान द्वीगुणीत होतो याबद्दल कोणतीही शंका नाही.      सुरुवातीला त्यांच्या आजोबांचे लहान बंधू ...