Skip to main content

Posts

Showing posts from September, 2025

" प्रशांत दळवी" लिखित एक गाजलेले नाटक " चारचौघी ": स्त्रियांच्या संघर्षाची कथा (short summary)

                                            "प्रशांत दळवी " लिखित "चारचौघी " या नाटकाचे मुखपृष्ठ          प्रशांत दळवी हे प्रसिद्ध नाटककार आहेत आणि त्यांचे " चारचौघी " हे नाटक देखील तेवढ्याच  परिणामकारक पद्धतीने वाचकांच्या मनात वास्तवाची झालर असणारी धक्कादायक कथा मांडण्याचा प्रयत्न करते."चारचौघी " हे नाटकाचे असणारे वेगळे नावच हे नाटक वाचण्यास प्रवृत्त करते. या नाटकाचा विषय नक्की काय असेल या कुतूहूलापोटीच हे नाटक वाचण्याचे मी ठरवले.बऱ्याचदा नाटकांच्या असणाऱ्या नावावरूनच मी पुस्तक निवडत असते, याबाबतीतही तसेच घडले.आणि पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच अगदी शेवटपर्यंत पुढे काय होईल? ही उत्सुकता कायम राहिली.हे नाटक म्हणजे समाजमनाला पारंपारिक विचारसरतून बाहेर काढून समाजभान निर्माण करणारे वाटते.हे नाटक जरी तीन अंकांमध्ये विभागलेले असले तरीही, यातून मिळणारा संदेश अनमोल असाच आहे.           या नाटकाची सुरुवात एका मध्यम मध्यमवर्गीय...

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...