विजय तेंडुलकर यांचे लिखाण म्हणजे वाचकांसाठी पर्वणीच. या नाटकातील मुख्य आशय समजणे अवघड आहे.हे नाटक पाहण्यात जेवढा आनंद होते तसाच ते नाटक वाचत असताना होतो. विजय तेंडुलकर हे प्रसिध्द लेखक,पटकथाकार, दिग्दर्शक आणि राजकीय विशलेषक म्हणून सर्वांना परिचित होते.
हे नाटक दोन अंकामध्ये विभागलेले आहे.या नाटकाची सुरुवात होते ती गणेश स्तवनाने.घाशीराम कोतवाल,नाना फडणवीस, गुलाबी,ललीतागौरी, ब्राह्मण, सूत्रधार ही या नाटकातील मुख्य पात्रे आहेत.यामध्ये घाशीराम सावळदास हा कणोजमधील एक गरीब ब्राह्मण आपले नशीब आमावण्यासाठी पुण्यामध्ये आलेला असतो.सुरुवातीला कोणी ओळखीचे नसल्याने तो तमाशातील गुलाबी नामक नर्तकी कडे आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि सोंगाड्याचे काम करत असतो.त्याठिकाणी सुरवातीला पुण्यातील भ्रष्ट कारभार आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये प्रामुख्याने नाना फडणवीस आणि पुण्यातील प्रत्येक ब्राह्मण बावणखानी याठिकाणी जेथे वेश्या व्यवसाय सुरू असतो तेथे जाताना पाहायला मिळतात.तेथील स्त्रियाही वाईट वर्तणूक करताना दिसतात.
एक दिवस नाना फडणवीस गुलाबी हीचा नाच पाहण्यासाठी आलेले असतात.नाच पाहता पाहता तेही तिच्यासोबत नाचायला लागतात आणि त्यांचा पाय मूर्गळतो.तेथे असणाऱ्या घाशीराम च्या पाठीवर पाय ठेवून ते आराम करतात.त्याच्या बोलण्यावर खुश होऊन ते त्याला मौल्यवान किमतीचा एक हार देतात.ते गेल्यानंतर गुलाबी तो हार हिसकावून घेत त्याला हकलवून लावते.पुढे पर्वतीच्या रमण्यात ब्राह्मणांना जेवण देण्यात येत असते त्याठिकाणी तो जातो पण तिथे त्यालाच चोर ठरविण्यात येते.तसेच मारहाण करून त्याला हद्दपारीची शिक्षा सुनावली जाते.या दोन प्रसंगानंतर त्याची व्यक्तीरेखा पूर्णपणे बदलते आणि सूडाची भावना त्याच्या मनात घर करते.तो म्हणे "अब मै हु शैतान! अंदरसे शैतान औ र बहरसे सुव्वर.जो मुझे बनाया तुम लोगोने."पुढे नाना फडणवीसांनच्या स्त्री लंपटपणाचा फायदा घेण्याचे घाशीराम ठरवितो. आपल्याच मुलीला ललीतागौरीला तो त्यांच्या हवाली करतो.तिला भेटण्यासाठी नाना तळमळतात.माझ्या मुलीच्या बदल्यात पुण्यातील श्रीमंत लोकांची थोबडे बंद करण्यासाठी पुण्याचा कोतवाल करण्याची मागणी करतो.घाशीराम सावळदास हा पुण्याचा कोतवाल बनतो. ब्राह्मनांच्या गर्दीत नाना दिसेनासे झाल्यावर घाशीराम कोतवाल प्रवेश करतो आणि इथेच पहीला अंक संपतो.
दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला पुण्यनगरीत घाशीराम कोतवाल झालेला आहे.त्याचा परवानगीशिवाय कोणतेही काम केले तर परवाने मागितले जात आहेत,खटले भरले जात आहेत, तुरुंगच्या तुरुंग भरले जात आहेत. संपुर्ण पुण्यनगरी घाशीराम याच्या नियमांनी हवालदिल झालेली आपल्याला पाहायला मिळते.प्रत्येक गोष्टीची सक्ती झालेली आहे.त्यातच एका गरीब ब्राह्मण ज्याने चोरी केलेली नसते त्यालाही कठोर शिक्षा सुनावली जाते.पुढे नाना फडणीसांच्या लग्नाचे वर्णन दिले आहे.आपल्याकडे आता पैसे आहेत ,सत्ता आहे आणि मुलीचे लग्न झाले पाहिजे हा विचार त्याच्या मनात येतो.त्यासाठी तो नाना फडणवीसांना मुलीबद्दल विचारतो.त्यावेळी चंद्रा सुईन ,नानांच्यामुळ पोटात वाढणाऱ्या मुलाला जन्म देत असताना तिचा मृत्यू झाल्याचे सांगते.हे समजल्यावर त्याला खूप दुःख होते.तो विचार करू लागतो की आपल्या सत्तेच्या हव्यासमुळे आपण मुलीचे आयुष्य संपवीले.या प्रसंगानंतर तो नियम जास्तच कडक करतो. बाहेरगावाहून आलेल्या ब्राह्मणांना तुरूंगात बंद करतो आणि संख्या जास्त असल्याने बावीस ब्राह्मनांचा तुरूंगात गुदमरून मृत्यू होतो.या घटनेने सर्व पुणे पेटून उठते आणि घाशीराम कोतवाल याच्या वधाचा हुकुम मागतात.नाना फर्मनवर सही करतात आणि म्हणतात की काट्याने काटा निघाला नाही तरी त्याचा आता काय उपयोग राहीला होता.शेवटी सर्व ब्राह्मन त्याला मारून टाकतात.
अशा प्रकारे हे नाटक ऐतिहासिक नाही तर यातील आशय समजून घेणे खूप गरजेचे आहे
Comments
Post a Comment