Skip to main content

'शांभवी हर्डीकर ' लिखित एक पुस्तक ( आत्मचरित्र ) ' तुझ्याशीच बोलतेय मी......'

 हे आत्मचरित्र इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. लेखिकेने हे पुस्तक दैनंदिनी किंवा रोजनिशीचच्या स्वरूपात मांडलय आणि  हेच वेगळेपण वाचकाचे मन हे पुस्तक वाचण्यासाठी आकृष्ट करते. हे फक्त आत्मचरित्रच नाही तर मानवी जीवनाची शोकांतिका आणि मृत्युतील वास्तविकता याच वाचकांना दिलेलं दर्शन आहे. लग्न झाल्यावर एखादी स्त्री तिच्या भावी आयुष्याची कितीतरी स्वप्न रंगविते. पण लग्नामध्ये सात जन्म साथ देण्याचे वचन देणारा साथ सोडून गेला तर त्याचे दुःख वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.हीच गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे.

यात लग्ना आधीची ' गीता ' आणि लग्नानंतरची ' शांभवी ' हिच्या आयुष्यातील वास्तवता दाखविली आहे. १९७३ मध्ये किंवा त्याच्या जवळपास शांभवीला  जयकर लग्नाची मागणी घालतो.कारण ' नयना ' या मुलीवर प्रेम केल्यावर तिच्या वडिलांनी हे प्रेम नाकारलेले असते. या धक्क्यातून सावरण्यासाठी तो शांभवीला लग्नाची मागणी घालतो.ती त्याला आवडते आणि प्रेम लग्नानंतर होईल अशा साध्यासोप्या भाषेत तो तिला समजावतो. त्यानंतर चार महिन्यांचा अवधी घेऊन ती त्याला होकार देते आणि १९७५ मध्ये त्यांचं लग्न होत. लग्नाच्या वेळी जयकरचे अश्रू कदाचित आपण तिला शेवट देऊ शकणार नाही, याची जाणीव झाल्याचे तर नसतील असेच वाटते. जयराम हा मराठीतील एक नावाजलेला नट असतो पण १९८० मध्ये त्यांच्या गाडीची ट्रकशी टक्कर होते. तो बाहेर येतो. पण शांता जोग ही गाडीत राहिलेली असताना ती जयरामला हाक मारते आणि पेट्रोल पडून गाडीला आग लागते. यात शांती जोग जयरामलाही देवाघरी घेऊन जाते. शांती जोगचा नवराही शांभवीचे पाय धरुन रडतो तो यासाठीच. फक्त  पाच - सहा वर्षांचा सहवास शांभवीला खूप काही शिकवून गेला हे तिच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. आणि या दुःखद घटनेनंतर दोनच महिन्यांत आपल्या मुली ' सोनी आणि मोनिसाठी ' बँकेत नोकरी करणाऱ्या या व्यक्तिमत्वाला सलाम करावासा वाटतो. ती पुढे जाऊन मुलींचे लग्न करते , आणि तेही कुणाकडून कशाचीही अपेक्षा न करता. आणि आपल्या नातवंडांमध्येही ती तिच्या प्रेमाला ' जयरामलाही ' शोधत राहते. 

खूप वर्षे निघून गेली तरी ती ' जयरामला ' शोधण्याचा प्रयत्न करते. जयराम सारखी hair style असणारा कुणी दिसला तर वास्तव विसरून बघत राहते. संवाद साधण्यासाठी planchet चाही आधार घेते. हे पुस्तक वाचताना, खरचं ज्याने आपलं प्रेम गमावलं त्यालाच त्याची किंमत कळते हे प्रकर्षाने जाणवते.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...