Skip to main content

' फणासाखालच घर '......लेखक ' चंद्रकुमार नलगे '

 हे पुस्तक माझ्या पहिल्यांदाच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे फक्त कथासंग्रह नसून माणसाच्या आयुष्यातील वास्तवता दर्शवते. यातील प्रत्येक कथा मनाला भुरळ घालते.' चंद्रकुमार नलगे ' यांची लिहिण्याची कला ही मनाच्या गाभाऱ्यात जवळीकता साधते.या पुस्तकातील कथा पुढीलप्रमाणे आहेत.

१) फणसाखालच घर - ही कथा आहे एका कुटुंबाची.ज्यामध्ये काळू मामा आणि सरसाबाई यांचा एकुलता एक मुलगा ' बाबुन्या ' घर सोडून कामासाठी मुंबईला जातो.आणि मुंबई टोळीत एके दिवशी मारला जातो. हे समजल्यावर एका घराची स्वप्न कशी उद्वस्थ होतात, हे वाचताना काळजाला चटका बसतो.

२) चाळ - घरची गरिबी आणि नशिबानं आलेलं अनाथ पण अक्षरशः चाळही पायात बांधायला लावते आणि छबुचे अपंगत्व जीव देण्यास प्रवृत्त करते. अशी ही छ लू , छ बु आणि त्यांच्या भावाची कथा.

३) मस्तक - ही कथा आहे, एका नाकासमोर चालणाऱ्या व्यक्तीची. ज्याला काटेकोर समाजाला भेदता येत नाही. पण सहनशीलतेची किंमत मुलीचा मृत्यू असतो. हे लक्षात आल्यावर त्याला स्वतःचाच राग येताना पाहायला मिळतो.

४) आणि चोर आले - ही कथा खूपच विनोदी आहे. यामध्ये एका कॉलनीतील विविध लोक, त्यांचे निराळेपण आणि चोर येतील या भीतीने त्यांनी केलेला बंदोबस्त हे वाचणे खूप मजेशीर आहे. आणि कथेच्या शेवटी पोलिस येतात आणि या खबरदार नगरची अब्रू लुटून नेतात. या कथेतील प्रत्येक प्रसंग खूप गमतीदार आहे.

५) सरहद्द - अनाहूतपणे दोन गावांच्या सरहद्दीवर भेटलेले दोन जीव वैजू आणि श्रीरंग. लग्न होऊनही श्रीरंग याच्या मृत्यूमुळे ते एक होऊ शकत नाहीत. पण सरहद्द आणि ते आंब्याचे झाड त्याठिकाणी असते.

६) स्वप्नसती - ' असमा ' या आईचे मुलीप्रती असणारे प्रेम आणि नशिबाच्या दुःखद फेऱ्यातून न सुटणाऱ्या या मायलेकी यांची ही कथा. आणि ' सलमच्या ' घरातून गायब होण्यापासून तिच्या आईची यातना या कथेत पाहायला मिळते.

७) चकवा - या कथेत ' बबेराव ' कुत्रं चावत. आणि त्या कुत्र्याला पकडण्यासाठी त्याचा चाललेला अटपी टा आणि हे कुत्र चावलेल असत ते मरत आणि तेव्हा त्याची झालेली अवस्था लक्षात राहण्यासारखी आहे.

८) कुकडी - ही कथा एका वृध्द महिलेची आहे.जी शेण गोळा करण्याचं काम करत असते. त्यातच भुकेपोटी एका घरात येऊन ' आमच्याही लेकान अस आणलाय ' अस म्हणणारी आणि प्रत्यक्षात एकटी राहणारी ही जिगरबाज म्हातारी. शेवटी भूकबळी ठरते आणि मनाला चटका लावुन जाते.

९) धण्णू - ही कथा आहे एका सामन्याची. ज्याच्या मुलानं आत्महत्या केल्यावर वेडा झालेला हा ' धंनु ' प्रत्यक्षात ज्या वाड्यातील पाळण्यामुळे तो जिवंत राहिला, त्या वाड्याला तो शेवटपर्यंत विसरत नाही. नतमस्तक व्हावे असच हे व्यक्तिमत्त्व.

१०) पाळत - ही कथा आहे, धर्मा आणि त्याची बायको गुंठीची. ज्यात ऊस तोडताना लहानपणी पाहिलेली एक घटना आणि त्याच्यातूनच आपल्या बायकोला बाहेर जाऊ न देण्याचा त्याचा निश्चय आणि शेवटी एका अपघातात त्याचा झालेला मृत्यू , हा सगळा मिलाफ या कथेत पाहायला मिळतो.

११) लंका - यामध्ये एका माकडाने एका वसाहतीत चालवलेला चोरीचा मामला दर्शविला आहे.

१२) झुला - या कथेत दुष्काळामुळे बैल विकण्याची वेळ लोकांवर आली. आणि बैलांच्या त्या झुल्या कडे पाहण्याची कुठली आशाच राहिली नाही.या आशयाची कथा याठिकाणी मांडली आहे.

१३) गिन्यान - दोन गाव वाल्यांचा अनुभव पर संवाद खूप काही ज्ञान सहजच देऊन जातो, त्याची ही कथा.

१४) काळाची पावलं - या कथेत सयाजीराव ने कारखान्यावर केलेला कब्जा आणि त्यातूनच चांगल्याच होत चाललेलं अधःपतन या कथेत दाखविले आहे.

१५) गावगुंडी -आवबादाजीचे निवडणुकीत हारणे आणि विसुचे जिंकणे दाखविताना शेवटी गावावर वीज कोसळल्याचे चित्र उभा करत मर्मिकाता दाखविली आहे.

अशा प्रकारे या पुस्तकातील प्रत्येक कथा काही ना काहीतरी नवीन शिकवून जाते.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

"अनिल बर्वे" लिखित नाटक "आकाश पेलताना " short summary सारांश

           अनिल बर्वे लिखित नाटक   "आकाश  पेलताना " खऱ्या अर्थाने हे नाटक म्हणजे समाजकारण आपण कशाला म्हणतो आणि त्या पाठीमागे असणारे सत्य किती विदारक असू शकते, त्याचप्रमाणे यामधील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन या दोन्हीमध्ये मध्य साधत असताना जाणवणारे वास्तव मनाला सुन्न करून जाते. हे नाटक जरी काल्पनिक पात्रांना घेऊन लिहिले असले तरी त्यामध्ये  राजकारण कशा पद्धतीने असू शकते यावरही हे नाटक भाष्य करते.राजकारणाकडे बघत असताना सत्ताकारण आणि समाजकारण  कसे बदलते हे देखील या नाटकाच्या माध्यमातून लक्षात येते.            हे पुस्तक म्हणजे राजकारण आणि समाजकारण यामधील वास्तव परिस्थिती यावर विचार करायला भाग पाडते. या नाटकाची सुरुवात एका दृश्याने होते, ज्यात दोघेजण दारू पीत बसले आहेत आणि त्यांच्यात राजकारण आणि एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेले खून याबद्दल चर्चा चालली आहे. प्रत्येक गोष्ट घडण्यापाठीमागे एक व्यवस्था काम करत असते आणि तीच जर का भ्रष्ट असतील तर त्याठिकाणी चांगल्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. य...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...