Skip to main content

'किशोर शांताबाई काळे' लिखित एक आत्मचरित्र ' कोल्हाटयाच पोर'

 हे पुस्तक वास्तवाची जाणीव करून देणारे आहे.हे आत्मचरित्र असले तरीही त्यांनी प्रत्यक्षात भोगलेल्या वास्तवाची मनाला होणारी वेदना खूप काही सांगून जाते.

या पुस्तकाचे नाव ज्याप्रमाणे वेगळे आहे ,त्याचप्रमाणे लेखकाचे नावही वेगळे आहे.जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला ,वडिलांच्या नावाऐवजी लेखकाने आईचे नाव का लावलेले आहे त्याचे विदारक सत्य समजते.पुस्तकाचे मुखपृष्ठ जसे वेगळे आहे त्याचप्रमाणे त्यांनी जगलेले आयुष्यही खूपच वेगळे असल्याचे समजते.लेखक ज्याप्रमाणे मनोगतात सांगतात त्याप्रमाणे समाजाला जाणीव व्हावी या हेतूने हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे.हे पुस्तक वाचत असतानाच कोल्हाटी समाज आणि त्या समाजातील दाहक वास्तव मला समजले. 

प्रत्येक समाज आणि त्या समाजातील लोकांचे जीवन वेगळे असते. या समाजात सुंदर मुलींनी जन्म घेणेच पापच.सुंदर दिसण्यामध्ये आणि त्यामुळे भोगावं लागणार दुःख न व्यक्त करता येण्यासारखं आहे.समाजाच्या बंधनामुळे आईच्या प्रेमाला बरीच वर्षे  पारखा झालेला आणि आईपासून दूर असताना ज्या आजोबांकडे, जीजीकडे राहत असताना भोगलेल्या यातना,सहन केलेला मार आणि त्यातूनही शिक्षणाची धरलेली कास वाचकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करते.एका रक्ताचे असूनही आई, भाऊ आणि लेखक यांची नावे मात्र वेगवेगळी आहेत.हे कशामुळे झाले आहे ,या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातील शेवटचे पान वाचल्यावर समजते. खरे पाहता,लहानपणापासून झालेल्या संघर्षमय प्रवासातून M.B.B.S. पर्यंतची लेखकाने मारलेली मजल आदर्शवत अशीच आहे.त्यांनी भोगलेल्या आयुष्याबद्दल वाचताना असे वाटते की त्यांच्या जागी दुसरा कोणी असता तर जीव दिला असता नाहीतर कुणाचा घेतला असता.पण शिक्षणाची सुरुवात करायची हे ठरविणारे लेखक खूप काही शिकवून जातात.त्यांनी तोंड दिलेली संकटे पेलण्यासाठी अंगी कोणत्या प्रकारचे सामर्थ्य असायला हवे याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो.

शिक्षण आणि जिद्द असेल तर परिस्थिती,जात,धर्म यांना भेदून एखादी व्यक्ती यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचते.आणि लेखकाने या आत्मचरित्रात आयुष्याचे केलेले चित्रण हेच आदर्शवत विचारांची प्रेरणा देऊन जाते.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

" हे नाटक आजही का वाचलं जातं?- सविता दामोदर परांजपे" Short summary

                              " सविता दामोदर परांजपे "                                                  लेखक : शेखर ताम्हाणे           मराठी साहित्य प्रकारात नाटक प्रकाराचा ज्यावेळी विचार होतो, त्यावेळी अनेक सुप्रसिद्ध नाटककारांची आठवण होते. त्याचप्रमाणे विविध नाटकांचे लेखन करणारे लेखक 'शेखर ताम्हणे ' यांनी 'आंगतूक ' ही कादंबरी,'ट्रॅक ','रॉंग नंबर'  यासारख्या एकांकिका,तसेच ' सविता दामोदर परांजपे ' आणि 'तू फक्त हो म्हण','तिन्ही सांज',' वेलकम जिंदगी' इत्यादी नाटके लिहिली आहेत. पण ते जास्त लोकप्रिय झाले ते 'सविता दामोदर परांजपे ' या नाटकामुळे. या नाटकावर आधारित याच नावाने चित्रपट बनविण्यात आला आहे. हे नाटक जरी दोन अंकात असले तरीही अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे ते शेवटपर्यंत वाचकाला कथेमध्ये खिळवून ठेवते. एक स्त्री कोणकोणत्या अनुभवातून जात असते, तिचा संघर्ष कसा ...