Skip to main content

'भिमराव गस्ती ' लिखित पुस्तक ' बेरड ' (आत्मचरित्र)

 या पुस्तकाच्या पृष्ठभागावरून या पुस्तकात काय असेल याची जाणीव होते.यामध्ये उल्लेख केलेल्या घटनांची दाहकता न पटण्यासारखी असली तरी त्याला सत्याची किनार आहे.आणि सत्याचे तेच धागे हे पुस्तक वाचताना मनाला पोखरतात, मन सुन्न करतात.

 'भिमराव गस्ती' यांनी चळवळी, आंदोलन आणि समाजकार्य यातून काय मिळविले हा वेगळा प्रश्न असला तरी त्यांची समाजकार्याची सुरुवात बालपणात झालेली आहे.' यमनापुर ' या गावी जन्म घेतलेले 'भिमराव ' इतर मित्रांच्या संगतीला झुगारून शाळेशी मैत्री करतात.आणि त्यासाठी त्यांच्या वडिलांचा खंबीर पाठिंबा पाहायला मिळतो. पुढे याच शिक्षणाचा उपयोग समाजाला न्याय देण्यासाठी करण्याचे ते ठरवितात. त्यावेळी मात्र ते एकटेच बाजूला पडतात.ना घरच्यांचा पाठिंबा, ना समाजाचा आणि ज्यांच्यासाठी त्यांनी झगडायचे ठरविले त्यांचाही पाठिंबा असत नाही. अशा परिस्थितीत नोकरी मिळत असताना, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी  झट नाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला खरा सलामच. समाजकार्यात वाहून घेतल्यानंतर कुटुंबाकडे  दुर्लक्ष झाले आणि तरीही समाजसेवेची वाट त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. हे व्यक्तीमत्त्व मनात जिद्द असेल आणि शिक्षणाची सोबत व संयम असेल तर व्यक्ती जगात जगात काहीही करू शकतो, हीच प्रेरणा देऊन जाते.

पण या पुस्तकात त्यांनी मांडलेले सत्य म्हणजे विस्तवाशी झुंज देणे असेच वाटते. लहानपणी बेरड समाजात जन्माला आल्याने सर्वजण त्यांना चोर म्हणून हिनवतात. कित्येक वेळा त्यासाठी शिक्षकांचा मारही त्यांना खावा लागतो. आणि दुसऱ्याच्या कृत्याची शिक्षा लहानपणापासून तेही अनुभवतात. शाळेत शिकत असताना पोलिसांच्या मारातून त्यांच्या भावाचा झालेला मृत्यू, मन हेलावून टाकतो. त्याचप्रमाणे त्यांनी समाजासाठी संघटना तयार करणे, परिषदा भरविणे आणि काही वेळेस त्यामध्ये लोकांचा पाठिंबा न मिळणे , हे पण वेगळा विचार करायला भाग पाडते. बेरड समाज असलेल्या दोन गावात झालेली भांडणं आणि त्यातून न सांगता येण्यासारखे अत्याचार करणारे पोलिस आणि या तिढ्यातून जातीबांधवाणी त्यांनाच खुनाची दिलेली धमकी वास्तवाला कायम जिवंत ठेवते. त्याचप्रमाणे भीमरावांच्या वाढत्या प्रस्थाला आडकाठी करणारे राजकारणीही पाहायला मिळतात . पण आपल्या गावासाठी, समाजासाठी सायकलवरून गावोगावी फिरणारे' भिमराव गस्ती'दुसरे आंबेडकर वाटतात. त्यातच शेवटी ' यल्ल्या ' या सोळा वर्षांच्या मुलाचा झालेला खून आणि पैशाने दडपविलेले सत्य म्हणजे ' दाहक वास्तव '. हे आत्मचरित्र आहे, असे म्हणताना या महात्म्याने एवढे सोसून आपले कार्य अखंडित कसे काय ठेवले असेल आणि तेही राजकारणाचा कोणताही आधार न घेता, याबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

Comments

Popular posts from this blog

"वि. वा.शिरवाडकर(कुसुमाग्रज) यांच्या अजरामर नाटकाची ओळख - नटसम्राट summary "

                        "  वि. वा. शिरवाडकर" लिखित नाटक 'नटसम्राट ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ             "नटसम्राट " हे नाटक विष्णू वामन शिरवाडकर ज्यांना 'कुसुमाग्रज ' या टोपण नावाने ओळखले जाते यांनी लिहिले आहे.मराठी साहित्यात प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार म्हणून त्यांनी आपल्या नावाचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या अजरामर समजल्या जाणाऱ्या अनेक कलाकृतींमधील एक कलाकृती म्हणजे नटसम्राट. हे नाटक वाचत असताना शेक्सपियरच्या लिखाणाचा त्यांच्यावर गाढा प्रभाव असल्याचे  क्षणोक्षणी जाणवते. मराठी रंगभूमीवर नाटक सादर करणारे कलाकार अत्यंत मनापासून, त्यांना दिलेली भूमिका जिवंत करत असतात. यातूनच कुसुमाग्रजांना शेक्सपियरचे 'किंग लियर ' याचे मराठीत रूपांतर करावे अशी मागणी काही साहित्यप्रेमींकडून आलेली असताना, त्यांना सम्राट विषयी लिहिण्यापेक्षा रंगभूमीवरील वयोवृद्ध नटसम्राटाबद्दल लिहावेसे वाटले. आणि मराठी रंगभूमीला, मराठी साहित्याला ज्या नाटकाने वेड लावले त्या नटसम्राटाचा जन्म झाला. तीन अंकाम...

"अनिल बर्वे" लिखित नाटक "आकाश पेलताना " short summary सारांश

           अनिल बर्वे लिखित नाटक   "आकाश  पेलताना " खऱ्या अर्थाने हे नाटक म्हणजे समाजकारण आपण कशाला म्हणतो आणि त्या पाठीमागे असणारे सत्य किती विदारक असू शकते, त्याचप्रमाणे यामधील राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन या दोन्हीमध्ये मध्य साधत असताना जाणवणारे वास्तव मनाला सुन्न करून जाते. हे नाटक जरी काल्पनिक पात्रांना घेऊन लिहिले असले तरी त्यामध्ये  राजकारण कशा पद्धतीने असू शकते यावरही हे नाटक भाष्य करते.राजकारणाकडे बघत असताना सत्ताकारण आणि समाजकारण  कसे बदलते हे देखील या नाटकाच्या माध्यमातून लक्षात येते.            हे पुस्तक म्हणजे राजकारण आणि समाजकारण यामधील वास्तव परिस्थिती यावर विचार करायला भाग पाडते. या नाटकाची सुरुवात एका दृश्याने होते, ज्यात दोघेजण दारू पीत बसले आहेत आणि त्यांच्यात राजकारण आणि एका विशिष्ट पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेले खून याबद्दल चर्चा चालली आहे. प्रत्येक गोष्ट घडण्यापाठीमागे एक व्यवस्था काम करत असते आणि तीच जर का भ्रष्ट असतील तर त्याठिकाणी चांगल्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. य...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...