Skip to main content

Posts

Showing posts from November, 2025

प्रत्येक सामान्य माणसातला बाबुराव समजण्यासाठी "वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)" यांचे "आमचं बाबुराव " हे नाटक एकदा वाचायलाच हवं."Short Summary

                               वि. वा. शिरवाडकर लिखित नाटक " आमचं बाबूराव" याचे मुख्यपृष्ठ                प्रत्येक सामान्य माणसाला ज्यावेळी एका नजरेतून पाहतो, त्यावेळी तो माणूस नेहमीप्रमाणे आपलं आयुष्य जगत असतो. पण त्याचबरोबर स्वप्नात जे आयुष्य जगत असतो,ते नेहमीच्या आयुष्यापेक्षा खूप वेगळच असतं. वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) त्यांचे "आमचं बाबूराव" हे नाटक देखील याच वास्तवतेला वाचकांसमोर अतिशय सुंदरपणे ठेवण्याचा प्रयत्न करते. या नाटकात जरी वास्तव दाखवले असले तरीही त्यातील अनेक वाक्ये गमतीदार संवादाची तर काही संवाद वास्तवतेला जवळून स्पर्श करताना आढळतात.            हे नाटक तीन अंकांमध्ये विभागलेले आहे. नाटक जरी लहान असले तरी मनाचा वेध घेत मध्यमवर्गीयांच्या जीवनातील खरेपणाला स्पर्श करते. सुरुवातीला जरी नाटक गुंतागुंतीचे वाटत असले तरी, पुढे-पुढे मध्यमवर्गीय, सामान्य माणसाचा संघर्ष, त्याच्या कुटुंबीयांच्या त्याच्याकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आ...

तहानलेल्यांच्या व्यथा, वेदना आणि आयुष्य जाणून घेण्यासाठी लेखक "सदानंद देशमुख" यांची "तहान" ही कादंबरी नक्की वाचा.Short Summary

                                                  "सदानंद देशमुख" लिखित  "तहान " कादंबरीचे मुखपृष्ट            ज्या ठिकाणी शेती पावसाच्या पाण्यावर फुललेली आहे, पाण्याची टंचाई नाही त्या ठिकाणी पाण्याची किंमत कळत नाही. पण ज्यावेळी सदानंद देशमुख लिखित "तहान "ही  कादंबरी आपण वाचतो ,तेव्हा पाण्याच्या एका थेंबाची किंमत समजल्याशिवाय राहत नाही. हे पुस्तक वाचताना पाण्याच्या एका- एका थेंबासाठी तळमळणारे लोक, दुष्काळी गाव, पाण्याअभावी त्यांच्यासमोर उभ्या असणाऱ्या असंख्य समस्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत. एक लहानस गाव, गावात आपला संसार थाटणारे गावकरी, शेती बरोबरच काही जनावरे पाळणारे शेतकरी आणि पाण्याअभावी लोकांचे होत असणारी ससेहोलपट या सर्व गोष्टींचे चित्रण या कादंबरीमध्ये लेखक सदानंद देशमुख यांनी अत्यंत परिणामकारकपणे आणि मनाला अंतर्मुख करण्याचे हेतूने केल्याचे या ठिकाणी लक्षात येते.       या कादंबरीची सुरुवा...

मुली आजही इतक्या असुरक्षित का?

                                                      मुली आजही इतक्या असुरक्षित का?          मुली आजही इतक्या असुरक्षित का? या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलय. याचं कारण म्हणजे, मालेगावात तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून, ओळख पटू नये किंवा त्या मुलीने कुणाला सांगू नये याकरता तिचा चेहरा दगडाने ठेचून आरोपीने तिची निर्घुण हत्या केली. ज्या वयात चांगला -वाईट स्पर्शही कळत नाही त्या वयात आरोपीने तिच्या शरीराचे लचके तोडले. या घटनेमुळे गावातील लोक संतप्त झाले आहेत. बऱ्याच भागातून निषेध मोर्चे आणि आंदोलने होताना दिसत आहेत. ही घटना ज्यावेळी मी ऐकली त्यावेळी मन सुन्न झाले. खरंच मुलगा मुलगी एकसमान असे आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी खरं मुलीच आयुष्य सुरक्षित असेल का? असा प्रश्न कदाचित त्या जन्म देणाऱ्या आई वडिलांच्या मनात येत असेल असेच वाटते.       मुलगा आणि मुलगी असे म्हणताना त्या दोघांमध्ये शरीराने फक्त फरक असतो. पण ...

प्रेम आणि त्याच्या मर्यादा सांगणारी "सुधा मूर्ती" लिखित कादंबरी "बकुळा", मराठीत अनुवाद- "लीना सोहनी" short summary in marathi

                                "सुधा मूर्ती"  लिखित कादंबरी  " बकुळा " मराठीत अनुवाद - "लीना सोहोनी"                                                                       पुस्तकाचा सारांश  थोडक्यात                                                        बकुळा फुलांचे संकलित छायाचित्र        सुधा मूर्ती यांचे लिखाण म्हणजे वास्तव आणि काल्पनिकता यांचा सुंदर संगम असल्याचे नेहमीच जाणवते. बकुळा ही कादंबरी सुधा मूर्ती यांनी लिहिलेली आहे आणि या कादंबरीचा अतिशय सुंदरपणे मराठीत अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे. या कादंबरीला देण्यात आलेले नाव "बकुळा " यावरूनच या कादं...

गावाकडची ओढ समजण्यासाठी लेखक 'गोपाल नीलकंठ दांडेकर ' यांचे 'माचीवरला बुधा ' हे पुस्तक नक्की वाचा . Short summary in marathi

                   लेखक 'गोपाल नीलकंठ दांडेकर ' यांचे 'माचीवरला बुधा ' या पुस्तकाचा सारांश                                                         गावाकडील एक संकलित छायाचित्र       गाव आणि शहरातील जीवन यामध्ये खूप फरक असतो. आणि मुंबईसारख्या शहराचा विचार करत असताना तर त्यामध्ये खूपच अंतर जाणवते. ज्यावेळी या पुस्तकाचे शीर्षक वाचले 'माचीवरला बुधा ' त्यावेळी मनात प्रश्न आला की, नक्की या पुस्तकामध्ये काय असेल. आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत  'बुधा ' या पात्राने जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी देत एक वेगळे नाते निर्माण केले . लहानपणापासून मुंबई दिवस काढलेला 'बुधा ' यावेळी म्हातारपणी आपल्या गावाकडे जाण्याचे  ठरवतो आणि गावाकडे पोहोचण्याच्या  अगोदर असंख्य प्रश्न तो स्वतःच्या मनाला विचारताना दिसतो. हे पुस्तक वाचत असताना समजते की,'माची ' हे बुधाच्या गावाचे नाव आहे.   ...