Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

' लक्ष्मण माने ' लिखित एक प्रसिद्ध पुस्तक ' पालावरच जग '

       '  पालावरचे जग ' हे  'लक्ष्मण माने ' यांचे पुस्तक माझ्या वाचनात आले. या जगात आपल्याला असंख्य लोक भेटत असतात. काहीजण आपल्या आठवणीत राहतात, तर काही लोकांना काळाच्या ओघात आपण विसरून जातो. आयुष्याबद्दल आपण कितीतरी सुंदर कल्पना करत असतो. पण ज्या आयुष्याची आपण कल्पना करू शकत नाही, अशा काही लोकांचे अनुभव 'लक्ष्मण माने ' यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे.        पुस्तकाच्या सुरुवातीपासूनच त्यामध्ये भटक्या जाती-जमाती मधील लोकांचे अनुभव कथन केलेले आहेत. अशा जमाती ज्यांना स्वतःचे अस्तित्व नसते, ज्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी फिरावे लागते,ज्यांचे आयुष्य जात पंचायतीच्या निर्णयावर अवलंबून असते. पण काळाच्या ओघात या लोकांमध्ये बदल घडत आहेत. हे या पुस्तकाच्या रूपाने दाखविलेले आहे.        सुरुवातीला वैदू समाजाचे वर्णन आहे. लंगोटी लावून वाईच औषध, वाताचं औषध, सुई- दोरा विकणारा वैदू, माणसांच्या सावलीला बीचकणारा वैदू, गाढवाच्या पाठीवर बिऱ्हाड घालून कुत्र्यांची खांड्याच्या खां...

' गिरीश कर्नाड ' लिखित एक प्रसिद्ध नाटक ' हयवदन '( अनुवादक : चिं. त्र्यं. खानोलकर )

         गिरीश कर्नाड हे भारतीय नाटककार, दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध कलाकार होते. ' हयवदन ' हे त्यांनी कन्नड भाषेत लिहिलेले एक लोकप्रिय नाटक आहे. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद ' खानोलकर '  यांनी केलेला आहे. या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी अपूर्णतेकडून परिपूर्णते कडे जातानाच संघर्ष ' हयवदन ' या पात्रातून दाखविण्याचा खूप सुंदर प्रयत्न केलेला आहे.         या नाटकाची सुरुवात गणेश प्रार्थनेने केलेली आहे. भागवत या पात्राकडून संपूर्ण कथानक आणि नाटकातील इतर पात्रे यांचे वर्णन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये महाकाय श्रीगणेशाच्या रचनेबद्दल बोलताना आपल्या सारख्या लोकांना ईश्र्वराच्या संपूर्ण स्वरूपाची कल्पना  करता यावी यासाठीच हा खटाटोप असावा, असे सांगतात. त्यानंतर भागवत हे पात्र कथा सांगायला सुरुवात करते. त्यात ते सांगतात की, एका धर्मपुरी नगरात एक धर्मपरायन राजा राहत होता. या राज्याचा खूप नावलौकिक होता. याच नगरात ' देवदत्त शर्मा ' , एका ख्यातनाम पंडित विद्यासागर यांचा मुलगा आणि ' कपिल ' , एका लोहराचा मुलगा हे दोन जिवलग मित्र राहत होते. त्यामध्ये द...

' विजय तेंडुलकर ' लिखित एक प्रसिद्ध नाटक ' शांतता ! कोर्ट चालू आहे '

          विजय तेंडुलकर हे प्रसिध्द लेखक, पटकथाकार, साहित्यिक आणि नाटककार होते. त्यांच्या लिखाणातील वैचारिक प्रगल्भता आणि वास्तविकता वाचकाला आकर्षित करते.         ' शांतता! कोर्ट चालू आहे ' या नाटकातून तेंडुलकर यांनी स्त्री अस्तित्व आणि तिचा संघर्ष असा एक वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे नाटक तीन अंकामध्ये विभागलेले आहे. यामध्ये सुखात्मे, काशीकर,पोंगशे, सामंत, कर्णिक, रोकडे, सौ. काशीकर आणि कु. लीला बेणारे ही प्रमुख पात्रे आहेत.        नाटकाचा पहिला अंक सुरू होतो, तो एका खोलीच्या दालनात. ज्याठिकाणी एकदोन जुनाट लाकडी खुर्च्या, एक खोके, एक स्टूल आणि भिंतीवर एक बंद पडलेले घड्याळ आहे. याच हॉलमध्ये अभिरूप कोर्टाचा कार्यक्रम होणार असतो. सुरुवातीला सामंत तो हॉल उघडतात आणि त्यांच्या पाठोपाठ कू. लीला बेणारे तिथे पोहोचते. सामंत आणि बेणारे यांच्यामध्ये चर्चा सुरू होते. त्या चर्चेमधून कू. बेणारे शिक्षक असल्याचे लक्षात येते. स्वतः शिक्षकी पेशाबद्दल बोलताना त्या सांगतात की, ' शाळेत पहिल्या बेलला माझं पाऊल शाळेच्या आवारात असत...

' सुनिल डोईफोडे ' लिखित एक प्रसिद्ध कादंबरी ' मृगजळ '

  जेव्हा मी ही कादंबरी वाचायला सुरुवात केली तेव्हा वाचण्यात मला जास्त रस वाटत नव्हता. मात्र सुरुवातीची काही पाने संपल्यावर लेखकाची वाचकाला धरुन ठेवण्याची शाब्दिक ताकद प्रत्ययास आली. आणि पुढे काय होईल या उत्सुकतेपोटी हे पुस्तक वाचून संपल्यानंतर समाधान वाटले. या कादंबरीचा विषय ' मनोरुग्ण ' या व्यक्तिरेखांच्या वर्तुळावर आधारलेला आहे. शालीनीला होणारे भास, त्यानंतर विजयला, प्रियाला आणि काहीश्या सक्षम व्यक्तीरेखा आहे असे वाटणाऱ्या विजयच्या आईलाही शेवटी आपला मुलगा जिवंत असल्याचा भास, मन सुन्न करतो. लेखकाच्या शब्दात ताकद असते हे ,ही कादंबरी वाचताना लक्षात येते.  या कादंबरीची सुरुवात होते ती राजेशच्या रिसेप्शन पार्टीने. गावापासून दूर असणाऱ्या एका लॉनमध्ये त्याने पार्टीसाठी आपल्या मित्रांना बोलवलेले असते. सर्वजण गप्पात रंगले असताना त्यामध्ये अधिक रंग भरण्यासाठी प्रिया या व्यक्तिरेखेचा प्रवेश त्याठिकाणी होतो. प्रिया आल्यानंतर त्याठिकाणी विजयचा विषय निघतो आणि त्यातूनच विजय, राजेश आणि प्रिया या तिघांच्या मैत्रीबाबत समजते. आणि थोड्या वेळातच विजय, त्याची आई आणि त्याची बहीण शालिनी यांचा त्याठ...

'शांभवी हर्डीकर ' लिखित एक पुस्तक ( आत्मचरित्र ) ' तुझ्याशीच बोलतेय मी......'

 हे आत्मचरित्र इतर पुस्तकांपेक्षा वेगळे आहे. लेखिकेने हे पुस्तक दैनंदिनी किंवा रोजनिशीचच्या स्वरूपात मांडलय आणि  हेच वेगळेपण वाचकाचे मन हे पुस्तक वाचण्यासाठी आकृष्ट करते. हे फक्त आत्मचरित्रच नाही तर मानवी जीवनाची शोकांतिका आणि मृत्युतील वास्तविकता याच वाचकांना दिलेलं दर्शन आहे. लग्न झाल्यावर एखादी स्त्री तिच्या भावी आयुष्याची कितीतरी स्वप्न रंगविते. पण लग्नामध्ये सात जन्म साथ देण्याचे वचन देणारा साथ सोडून गेला तर त्याचे दुःख वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.हीच गोष्ट या पुस्तकात सांगितली आहे. यात लग्ना आधीची ' गीता ' आणि लग्नानंतरची ' शांभवी ' हिच्या आयुष्यातील वास्तवता दाखविली आहे. १९७३ मध्ये किंवा त्याच्या जवळपास शांभवीला  जयकर लग्नाची मागणी घालतो.कारण ' नयना ' या मुलीवर प्रेम केल्यावर तिच्या वडिलांनी हे प्रेम नाकारलेले असते. या धक्क्यातून सावरण्यासाठी तो शांभवीला लग्नाची मागणी घालतो.ती त्याला आवडते आणि प्रेम लग्नानंतर होईल अशा साध्यासोप्या भाषेत तो तिला समजावतो. त्यानंतर चार महिन्यांचा अवधी घेऊन ती त्याला होकार देते आणि १९७५ मध्ये त्यांचं लग्न होत. लग्नाच्या...

' लक्ष्मण माने ' लिखित एक पुस्तक ' उध्वस्त '( कथासंग्रह )

 ज्यावेळी मी हे पुस्तक वाचायला घेतले त्यावेळी हा कथासंग्रह आहे हे मी पाहिलेले नव्हते. जेव्हा पुस्तक वाचायला सुरूवात केली तेव्हा मात्र यातील प्रत्येक कथा मनाला भिडते. ' लक्ष्मण माने ' यांच्या लिखाणात  बोचरे पणा, वास्तवाची झालर आणि  वाचकांच्या मनाला जागृत करण्याची अफाट शक्ती आहे. आणि त्यामुळेच यातील प्रत्येक कथा काहीतरी शिकवून जाते.त्याचबरोबर यातील प्रत्येक व्यक्तीरेखा मनाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही.यामध्ये असणाऱ्या कथा पुढीलप्रमाणे आहेत: १) झाकली मूठ - ही कथा आहे ' आबा पाटील ' या सातारकराची आणि त्याच्या धुरणदरपणाची. कथेच्या सुरुवातीला असणारा गंभीरपना कथेच्या शेवटी थोडासा हसवून जातो. आबा पाटील यांची घरची परिस्थिती गरिबीची असते त्यामुळे ते मुंबईला जातात आणि परिस्थितीवर मात करून श्रीमंत बनतात.पण बापाच्या पैशावर मुले चैनी करतात, वाया जातात. आणि पुढे अचानक राजकारणातील बदलामुळे आबा पुन्हा गरीब बनतात. आता गरीब आबाला कोणीही जवळ करत नाही. पुन्हा म्हातारपणी त्यांचे हाल चालू होतात. आणि त्यावेळी त्यांच्या मित्राने सांगितलेल्या युक्तीमुळे त्यांचे म्हातारपण सुखात जाते. आणि मरतासमय...

'भिमराव गस्ती ' लिखित पुस्तक ' बेरड ' (आत्मचरित्र)

 या पुस्तकाच्या पृष्ठभागावरून या पुस्तकात काय असेल याची जाणीव होते.यामध्ये उल्लेख केलेल्या घटनांची दाहकता न पटण्यासारखी असली तरी त्याला सत्याची किनार आहे.आणि सत्याचे तेच धागे हे पुस्तक वाचताना मनाला पोखरतात, मन सुन्न करतात.  'भिमराव गस्ती' यांनी चळवळी, आंदोलन आणि समाजकार्य यातून काय मिळविले हा वेगळा प्रश्न असला तरी त्यांची समाजकार्याची सुरुवात बालपणात झालेली आहे.' यमनापुर ' या गावी जन्म घेतलेले 'भिमराव ' इतर मित्रांच्या संगतीला झुगारून शाळेशी मैत्री करतात.आणि त्यासाठी त्यांच्या वडिलांचा खंबीर पाठिंबा पाहायला मिळतो. पुढे याच शिक्षणाचा उपयोग समाजाला न्याय देण्यासाठी करण्याचे ते ठरवितात. त्यावेळी मात्र ते एकटेच बाजूला पडतात.ना घरच्यांचा पाठिंबा, ना समाजाचा आणि ज्यांच्यासाठी त्यांनी झगडायचे ठरविले त्यांचाही पाठिंबा असत नाही. अशा परिस्थितीत नोकरी मिळत असताना, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी  झट नाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला खरा सलामच. समाजकार्यात वाहून घेतल्यानंतर कुटुंबाकडे  दुर्लक्ष झाले आणि तरीही समाजसेवेची वाट त्यांनी शेवटपर्यंत सोडली नाही. हे व्यक्तीमत्त्व मनात जिद...

'किशोर शांताबाई काळे' लिखित एक आत्मचरित्र ' कोल्हाटयाच पोर'

 हे पुस्तक वास्तवाची जाणीव करून देणारे आहे.हे आत्मचरित्र असले तरीही त्यांनी प्रत्यक्षात भोगलेल्या वास्तवाची मनाला होणारी वेदना खूप काही सांगून जाते. या पुस्तकाचे नाव ज्याप्रमाणे वेगळे आहे ,त्याचप्रमाणे लेखकाचे नावही वेगळे आहे.जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला ,वडिलांच्या नावाऐवजी लेखकाने आईचे नाव का लावलेले आहे त्याचे विदारक सत्य समजते.पुस्तकाचे मुखपृष्ठ जसे वेगळे आहे त्याचप्रमाणे त्यांनी जगलेले आयुष्यही खूपच वेगळे असल्याचे समजते.लेखक ज्याप्रमाणे मनोगतात सांगतात त्याप्रमाणे समाजाला जाणीव व्हावी या हेतूने हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे.हे पुस्तक वाचत असतानाच कोल्हाटी समाज आणि त्या समाजातील दाहक वास्तव मला समजले.  प्रत्येक समाज आणि त्या समाजातील लोकांचे जीवन वेगळे असते. या समाजात सुंदर मुलींनी जन्म घेणेच पापच.सुंदर दिसण्यामध्ये आणि त्यामुळे भोगावं लागणार दुःख न व्यक्त करता येण्यासारखं आहे.समाजाच्या बंधनामुळे आईच्या प्रेमाला बरीच वर्षे  पारखा झालेला आणि आईपासून दूर असताना ज्या आजोबांकडे, जीजीकडे राहत असताना भोगलेल्या यातना,सहन केलेला मार आणि त्यातूनही शिक्षणाची धरले...

' फणासाखालच घर '......लेखक ' चंद्रकुमार नलगे '

 हे पुस्तक माझ्या पहिल्यांदाच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे फक्त कथासंग्रह नसून माणसाच्या आयुष्यातील वास्तवता दर्शवते. यातील प्रत्येक कथा मनाला भुरळ घालते.' चंद्रकुमार नलगे ' यांची लिहिण्याची कला ही मनाच्या गाभाऱ्यात जवळीकता साधते.या पुस्तकातील कथा पुढीलप्रमाणे आहेत. १) फणसाखालच घर - ही कथा आहे एका कुटुंबाची.ज्यामध्ये काळू मामा आणि सरसाबाई यांचा एकुलता एक मुलगा ' बाबुन्या ' घर सोडून कामासाठी मुंबईला जातो.आणि मुंबई टोळीत एके दिवशी मारला जातो. हे समजल्यावर एका घराची स्वप्न कशी उद्वस्थ होतात, हे वाचताना काळजाला चटका बसतो. २) चाळ - घरची गरिबी आणि नशिबानं आलेलं अनाथ पण अक्षरशः चाळही पायात बांधायला लावते आणि छबुचे अपंगत्व जीव देण्यास प्रवृत्त करते. अशी ही छ लू , छ बु आणि त्यांच्या भावाची कथा. ३) मस्तक - ही कथा आहे, एका नाकासमोर चालणाऱ्या व्यक्तीची. ज्याला काटेकोर समाजाला भेदता येत नाही. पण सहनशीलतेची किंमत मुलीचा मृत्यू असतो. हे लक्षात आल्यावर त्याला स्वतःचाच राग येताना पाहायला मिळतो. ४) आणि चोर आले - ही कथा खूपच विनोदी आहे. यामध्ये एका कॉलनीतील विविध लोक, त्यांचे निराळेपण आणि...

'व्यंकटेश माडगुळकर' लिखित एक सुप्रसिध्द पुस्तक 'माणदेशी माणसं'

 जेष्ठ मराठी लेखक, पटकथाकार,साहित्यिक,पटकथालेखक,अनुवादक म्हणून व्यंकटेश माडगूळकर प्रसिद्ध होते. त्यांचेच माणदेशी माणसं हे पुस्तक माझ्या वाचनात आले. या पुस्तकात लेखकाने माणदेशी माणसांच्या अनुषंगाने अनेक व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतलेला आहे.गावाकडील बलुतेदारी पद्धत आणि त्यामध्ये येणाऱ्या जातींचा उल्लेख करताना त्यांची जीवनशैली सांगायला लेखक विसरलेले नाहीत.  या पुस्तकाच्या सुरुवातीला आपल्याला  भेटतो धर्मा रामोशी. लेखकाच्या घरी प्रामाणिकपणे काम करणारा धर्मा रामोशी रेखाटताना वय झाल्यानंतर आयुष्याबद्दल बोलताना भागवतो कसतरी कळणाकोंडा करून....अस म्हणतो त्यावेळी हे व्यक्ती मनात घर करून जाते.गरिबितही स्वाभिमान जपताना धोतर मागताना दहा वेळा विचार करणारा आणि ते धोतर दुसऱ्या दिवशी धर्माची मुलगी बजा हिच्या अंगावर दिसते.त्यानंतर  भेटणारा ' लोहराचा झेल्या'जो नवीन मास्तरांची शाळेतून बदली झाल्यानंतर आता मी नाय जाणार मास्तर त्या शाळेत म्हणतो तेव्हा त्यातून शिक्षक आणि गुरूच नात कस असल पाहिजे हे समजते. ढोरावणी जीव! काय अंगभर चांगला धडूता मिळतय का गोडधोड खाया मिळतया ! आमा गरीबाच हे असच म्ह...